Fal Pik Vima Yojana
Fal Pik Vima Yojana राज्यांमध्ये सन 2021-22 मध्ये आंबिया बहार पिक विमा योजना राबवत असताना संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष आणि प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी, पपई यांना फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली होती.
शासन निर्णय
- आंबिया बहारमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
- यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये पिकविण्याचे वाटप देखील करण्यात आले होते.
- परंतु बऱ्याच पात्र झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा निधी वितरित न झाल्याचे कारण सांगून पिक विमा पासून वंचित ठेवण्यात आले होते.
- कृषी विद्यालयाच्या माध्यमातून 23 जून 2023 रोजी राज्य शासनाकडून निधीची मागणी करण्यात आली होती.
- एचडीएफसी ऍग्रो जनरल इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेल्या निधीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
Fal Pik Vima Yojana एकूण वितरित करण्यात आलेला निधी
- पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 अंतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी 24 लाख 94 हजार 288 रुपये रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमा कंपन्याला अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीचे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे मंजुरी देण्यात आलेली आहे.
- सदरची रक्कम आंबिया बहार हंगाम 2021-22 करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही.
- फळ पिक विमा योजना करता राज्य शासनाचा हिस्सा म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
- ज्यामुळे आता राज्य शासनाच्या हिस्साचा अनुदान उपलब्ध झाल्यामुळे पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उर्वरित पिक विमा वितरित करण्यासाठी मदत मिळणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज
केव्हा मिळणार शेतकऱ्यांना निधी
- Fal Pik Vima Yojana हा पिक विमा साधारणपणे 15 ऑगस्ट 20 ऑगस्ट च्या दरम्यान जे शेतकरी पात्र होतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊ शकतो.
Discover more from Shetiyojana
Subscribe to get the latest posts sent to your email.